अकोला दिव्य न्यूज : Congress MLAs praises of Haryana CM Saini : काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची स्तुती केल्याने हरियाणाच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. “कर्मठ मुख्यमंत्री, बहुत बढीया मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे अंत:करणापासून धन्यवाद”, अशा शब्दात काँग्रेसचे काही नेते हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत असल्याने हरियाणात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसचे आमदार शल्ली चौधरी (नारायणगड) आणि गोकुळ सेतिया (सिरसा) यांनी यांनी हरियाणामध्ये सरकार स्थापन झाल्याच्या तीन महिन्यांतच मुख्यमंत्री सैनी यांची स्तुती करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे काँग्रेसचे काही नेते भाजपात सामिल होण्याची संधी शोधत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या आमदारांनी तसचे भाजपाच्या नेत्यांनी देखील अशी शक्यता फेटाळून लावली आहे. सैनी हे नारायणगड आणि सिरसा या ठिकाणी दौऱ्यावर आले होते त्यावेळी ही स्तुती करण्यात आली. या दौऱ्यात सैनी यांनी या भागासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती.
२० जानेवारी रोजी सैनी आणि चौधरी हे नारायणगड येथे एका मंचावर आले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार चौधरी म्हणाले की, “आपल्याला इतके मेहनती मुख्यमंत्री मिळाले आहेत ही नारायणगडसाठी गौरवाची बाब आहे. आम्ही भाग्यवान आहोत की तो येथून पुढे आले आहेत. फक्त नारायणगडच नाही तर संपूर्ण राज्यातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. आमचा मतदारसंघ राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने मागे होता. एक (राजकीय) उणीव दूर करण्यात आली आहे कारण सैनी येथून पुढे आले आहेत परंतु विकासाच्या संदर्भात, मी त्यांना आमच्या इतर मागण्या पूर्ण करण्याची विनंती करू इच्छितो, यावेळी हरियाणाचे माजी मंत्री असेम गोयल यांच्यासह इतर भाजपाचे नेतेही उपस्थित होते.आपल्या नारायणगड मतदारसंघासाठी ट्रॉमा सेंटर, मेडिकल कॉलेज आणि गावातील पंचायतींसाठी निधी इत्यादीमागण्या केल्यानंतरही चौधरी सैनी यांची स्तुती करत राहिल्या. इतकेच नाही तर त्यांनी सैनी यांचा नारयणगडचे सुपूत्र असा उल्लेख देखील केला
त्याच दिवशी सैनी यांनी ४३.२८ कोटी रुपयांच्या १० विकास प्रकल्पाचे भूमीपूजन केले. तसेच त्यांनी या भागात सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा देखील केली. यासह हॉटिकल्चर कॉलेज, हॉकीसाठी अस्ट्रोटर्फ, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व गावांच्या विकासासाठी २० कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला.
सिरसा येथे सेतिया यांनी सैनी आणि भाजपाच्या नेत्यांचे व्यासपीठावर स्वागत केले. यावेळी त्यांनी एक प्रसंग देखील सांगितलं. “मी उपायुक्तांना विनंदी केली होती की मला मुख्यमंत्र्यांचे स्वागत करायचे आहे. पण मला आत (विमानतळात) जाण्याची परवानगी नव्हती. जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना मी बाहेर थांबल्याबद्दल समजले तेव्हा त्यांनी माझी तीन मिनिटं वाट पाहिली, मी शपथ घेऊन सांगतो की, माझा इतका सन्मान करणारा दुसरा व्यक्ती मी आजवर पाहिला नाही.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत आले. यानंतर सैनी यांनी नोव्हेंबरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली होती. माझा लक्षात आहे की नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर मी एक विनंती केली होती. तेव्ह तुम्ही मला कोणताही भेदभाव न करता राज्यभर समान विकास होईल असे आश्वासन दिले. आम्हाला एक दर्जेदार मुख्यमंत्री मिळाले आहेत. चांगल्या कामाचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मी विधानसभेतही म्हटले होते. केवळ मी विरोधी पक्षात आहे म्हणून मला सरकारचे चुका शोधत बसायचे नाही. गोकुळ सेतिया चांगल्या कामाचे नेहमीच कौतुक करेल. यामुळे सरकार चालवणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे म्हणत सेतिया यांनी हात जोडून सैनी यांचे आभार मानले.
गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काही महिन्यांनी अशी भव्य स्तुती केली जाते, ही निवडणूक जिंकण्याची अनेकांना अपेक्षा होती. आधीच घर व्यवस्थित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि भूपिंदरसिंग हुडा कॅम्प आणि इतर प्रतिस्पर्धी गटांमधील भांडणामुळे पक्षाला आणखी त्रास होण्याची शक्यता आहे. पक्षाने अद्याप आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केलेली नाही, जो विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करेल.
५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून जाट समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे हुड्डा आणि हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांना पक्षाने वगळले. यानंतर काँग्रेस पक्षातील दुफळी समोर आली होती. या प्रचारकांच्या यादीत राज्यसभा खासदार रणदीप सिंग सुरजेवाला आणि कुमारी सेलजा या नेत्यांचा समावेश होता. दिल्लीत जाट समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.