अकोला दिव्य न्यूज : शहर व जिल्ह्यातील गॅस पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करून एकही गरजू गॅसधारक आपल्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन व गॅस डीलर्स यांनी समन्वयाने काम करावे, असे कडक निर्देश आ.रणधीर सावरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ग्राहकांच्या तक्रारींसह डिलर्सच्या अडचणींचा आढावा घेत तातडीने यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी, अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच गॅस एजन्सी प्रतिनिधी उपस्थित होते. गॅस वितरणातील अडथळे, विलंब आणि तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.आमदार सावरकर यांनी स्पष्ट केले की, केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत आहे. जागतिक स्तरावर इंधन व गॅस दरवाढ होत असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच परराष्ट्र धोरणात एस. जयशंकर यांच्या समन्वयातून भारताने संतुलन राखले असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात २५ ते ३० दिवसांत गॅस मिळणे अपेक्षित असताना, हद्दवाढीतील भागात ४५ दिवसांचा विलंब होत असल्याची बाबही समोर आली. OTP न मिळाल्यामुळे अनेक ग्राहकांना नसल्याने सिलेंडर मिळत ऑफलाईन बुकिंग सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, गॅस एजन्सीच्या गाड्या चार दिवसांपासून प्लांटबाहेर उभ्या असून लोडिंग न झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. या सर्व समस्या पुढील दोन ते तीन दिवसांत मार्गी लावाव्यात, अन्यथा पुन्हा बैठक घेऊन कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला. बैठकीला डीएसओ येन्नावार, वाहूरवाघ, एचपीसीएलचे रिजवान तसेच विविध गॅस एजन्सींचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

.
