Sunday, December 21, 2025
No menu items!
No menu items!
Homeहाच तो धर्म ! श्री संत गजानन महाराज संस्थानने दिले पुरपिडीतांसाठी १...

हाच तो धर्म ! श्री संत गजानन महाराज संस्थानने दिले पुरपिडीतांसाठी १ कोटी ११ लाखाचा निधी

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आजच्या जगात धर्माच्या नावाखाली होणारे संघर्ष आणि भांडणे बघता, साने गुरुजींचा ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या कवितेतील हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो, जो लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि शांतता निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे. थोडक्यात, ‘हाच तो धर्म’ हे वाक्य माणुसकीचा धर्म, प्रेमाचा धर्म, माणुसकीचा धर्म सांगते आणि प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वर असल्याने प्राणीमात्रावर प्रेम करणे हाच खरा मानवता धर्म असल्याने गजानन महाराजांनी ‘गण गण गणात बोते’ मधून भाविकांना एका उदात्त मूल्यांकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. प्रत्येक क्षणाला ‘गण गण गणात बोते’ स्मरणात ठेवून ‘हाच तो धर्म’ वर कार्य करणारे शेगांव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील असं एकमेव संस्थान आहे की जे केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नाही तर ते नेहमीच धर्मादाय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिले आहे. संस्थेचे अन्न छत्र (अन्न छत्र), शिक्षण, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा प्रकल्प आणि आपत्ती व्यवस्थापनातील योगदान यासह कार्य देशभरात ओळखले जात आहे.

या दुष्काळापूर्वीही पूर काळात संस्थेने सरकारला मदत केली. विशेषतः, स्वच्छतेच्या बाबतीत श्री संत गजानन महाराज संस्था देशात प्रथम क्रमांकाची मानली जाते. देशभरातील विविध संस्था संस्थेच्या कॅम्पसमधील स्वच्छता, सुव्यवस्था आणि हिरवळ यांचे अनुकरण करतात. येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छता, शिस्त आणि शांतता अनुभवायला मिळते. म्हणूनच, पवित्र शहर शेगाव हे केवळ आध्यात्मिक राजधानीच नाही तर स्वच्छतेची राजधानी देखील मानले जाते.

श्री गजानन महाराजांचा संदेश भक्ती, सेवा आणि समर्पणाचा आहे. त्याचप्रमाणे, संस्था संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी पुढे येऊन सेवेच्या संकल्पनेचे अनुकरण धर्म म्हणून करत आहे. या मदतीमुळे पूरग्रस्तांना मदत मिळेल. समाजसेवा आणि स्वच्छता कार्यात आघाडीवर राहून, संस्था खरोखरच प्रेरणास्थान असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्थिक मदत देऊन, संस्थेने सेवा कार्यासोबतच सामाजिक जबाबदारीही पार पाडत असून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना सहाय्य करण्यात सदैव अग्रेसर राहत आले आहे. यात तीळमात्र शंका नाही.

सध्या महाराष्ट्राला पावसाने धुतल्यामुळे संपुर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप मोठे नुकसान झालेले आहे.डोळ्यांदेखत होत्याचं नव्हतं झालं अन् शेतकऱ्यांचा डोळ्यातून पाणी वाहत आहे.अस्मानी संकटातील अन्नदाताची अश्रू पुसण्यासाठी,अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही गाजावाजा न करता शेगांव येथील संत श्री गजानन महाराज संस्थान या न्यासाचे वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी ११ लाखाचा सहयोग निधी दिला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेशाद्वारे १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे. पुरामुळे बाधीत झालेल्या पुरपिडीतांसाठी सहयोग निधी देणारे कदाचित हे पहिले संस्थान असून, धर्माच्या रूढ कल्पनांपेक्षा मानवता, माणुसकी आणि निःस्वार्थ प्रेम यांसारख्या मूल्यांना महाराजांनी अधिक महत्त्व दिले आणि महाराजांनी संजीवनी समाधी घेतल्याच्या क्षणापासून आजगत शेगांव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान देखील मानवता, माणुसकी आणि निःस्वार्थ प्रेम यांसारख्या मूल्यांची जोपासना करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!