Saturday, April 26, 2025
HomeUncategorized'ते' पर्यटक अकोल्यात सुखरूप परतले ! अनेकांना झाले अश्रृ अनावर

‘ते’ पर्यटक अकोल्यात सुखरूप परतले ! अनेकांना झाले अश्रृ अनावर

अकोला दिव्य न्यूज : २५ वर्षांत पहिल्यांदाच झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यूने प्रचंड असंतोष पसरला असून, पहलगामला पोहोचण्यापूर्वीच हा हल्ला झाल्याने बजावलेले अकोल्यातील 30 पर्यटक आज सकाळी रेल्वेने अकोला शहरात सुखरूप परतले.आप्तकुटुबिंयाच्या गळाभेटीने अनेकांना हुंदका फुटला. भावविवश होऊन सर्वांचे अश्रृ अनावर झाले.

अकोला येथील गुरूमाऊली टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अकोला शहरातील अशोक आमले, गुम्फा आमले, मुग्धा देशमुख, मंगल वैद्य, शुभम डोमकुलवार, वर्षा मराठे, माधुरी दामले, रवींद्र रोही, रजनी रोही, मंगेश अंबरखाने, सुनीता अंबरखाने,अभिषेक शिंगरुप, मंजुश्री शिंगरुप, इंद्राणी शिंगरुप,आरोही शिंगगरुप, संदीप सकडकळे, प्रेरणा सकडकळे, गंगा बोरडकर, शुभा कुलकर्णी, शिला भोपले, अशोक बडगुजर, अर्चना बडगुजर, अभिषेक बडगुजर, माया बडगुजर, राजेश्री शर्मा, सुनदा नवले, प्रदीप देव, संगिता देव,पंकज साहू आणि अंबादास सप्रे हे जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. याच प्रवासात पहलगाम येथेही जाणार होते.

जम्मू येथील पर्यटन स्थळे बघून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले होते.पहलगामपासून जवळ असलेल्या सोनमर्ग येथील पर्यटन स्थळे बघून ते पहलगाम करीत रवाना होणार असताना ही घटना घडली. तेव्हा तातडीने सर्वांना श्रीनगरला नेण्यात आले. तेथे सर्वजण घाट क्रमांक 6 समोरील हाऊस बोट मध्ये मुक्कामी होते. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे काम सुरू झाले आणि आज हे सर्वजण अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचलो आणि त्यानंतर आपआपल्या परिसरात आले. तेव्हा वातावरण भारून गेले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!